धाड ,(प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली चिरडल्या गेल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ५ जानेवारीच्या ४.५० मिनिटांनी करडीच्या (धाड) पुलावर घडली. अपघातात इतका भीषण होता की, यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

मलकापूर आगाराची बस क्रमांक एमएच-०६-बीडब्ल्यू-३६३८ क्रमांकाची एसटी बस आज ५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरवरुण मलकापूरला जात होती. तर ढाल सावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे मोटारसायकलवर स्वार होऊन धाडवरून कराडीच्या दिशेने जात होते. सदर बस सायंकाळी ४.५० मिनिटांनी करडी (धाड) येथील पुलावर येताच या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. नव्हेतर दुचाकी चुरा होऊन बसखाली घुसली. यामध्ये दुचाकीस्वारांना गंभीर मार लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यातील एकाच्या डोक्याची कवटी फुटून त्याचा मेंदू अक्षरशः बाहेर पडला. या दुर्दैवी घटनेमुळे ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसही दाखल झाले आहेत.