दिनविशेष: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक राजे उमाजी नाईक पुण्यतिथी

राजे उमाजी नाईक (७ सप्टेंबर १७९१-३ फेब्रुवारी १८३२) हे महाराष्ट्रातील एक थोर आद्यक्रांतिकारक होते. त्यांनी १८२६ ते १८३२ च्या दरम्यान ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. पुणे जिल्ह्यातील भिवडी (पुरंदर) येथे जन्मलेले उमाजी नाईक रामोशी समाजाचे असून, त्यांनी इंग्रजांच्या सत्तेला सुरुवातीच्या काळातच गनिमी काव्याने ‘सळो की पळो’ करून सोडले होते. उमाजी नाईक यांनी लहानसे सैन्य उभे केले होते. उमाजी नाईक यांनी १८२६ ते १८३२ च्या सुमारास ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले. उमाजी नाईक यांच्या नेतृत्वात रामोशी समाजाचा उठाव झाला होता. त्यांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहून इंग्रजांविरुद्ध जाहीरनामा काढला, परंतु फितुरीमुळे त्यांना पकडून ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यातील खडकवासला येथे फाशी देण्यात आली. पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांच्या १९३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.


