मोताळा, प्रतिनिधी: जगात गाईसारखे रहा, सापासारखे नाही. गाय गवत खाते पण बदल्यात दूध देते, तर साप दूध पितो पण बदल्यात विष देतो. जे गाईसारखे वागतात ते गोविंदासारखे पूजले जातात आणि जे सापासारखे वागतात ते शैतान कहलवले जातात. जीवनात विश्वास, नाते, हृदय आणि वचन या चार गोष्टी तोडू नका. त्या तुटल्या की आवाज होत नाही, पण वेदना होतात. एकमेकांना जपून निभावणे हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत महोपाध्याय ललित प्रभ सागर महाराज यांनी केले.
सोमवारी सकल जैन संघाच्या वतीने जैन स्थानक येथे आयोजित ‘जीने की कला’ प्रवचनात ते भाविकांना संबोधित करत होते. ते म्हणाले, रांगोळी दोन दिवसांची असते, तरीही आपण ती सुंदर सजवतो. त्याचप्रमाणे जीवनही काही वर्षांचेच असते, ते श्रेष्ठ कर्मांनी सजवण्याचा प्रयत्न करा. केवळ अधिक धन असल्यानेच जीवनात आनंद मिळत नाही; आनंदासाठी प्रेम आणि गोडव्याचे रंग मिसळणे आवश्यक आहे. चेहरा देणे हे निसर्गाचे काम आहे आणि चेहऱ्याला रंग देणेही निसर्गाचेच काम आहे; पण जीवन पाहण्याची आणि जगण्याची पद्धत कशी असावी, हे आपल्या हातात आहे. असे जीवन जगा की ते इतरांनाही इंद्रधनुष्याच्या रंगांसारखा सुकून देईल.
आप्तांपासून तुटून जगणे ही विकृती आहे. एकमेकांसोबत जगणे ही प्रकृती आहे; पण समजूत काढत एकमेकांना निभावणे ही आपली संस्कृती आहे. जीवनात महत्त्वाचे हे नाही की आपल्याला लोकांकडून काय मिळाले, तर आपण इतरांसाठी काय योगदान दिले हे महत्त्वाचे आहे. जे देतात तेच महान बनतात. सूर्य प्रकाश देऊन, चंद्र शीतलता देऊन, ढग पाणी पाडून आणि वृक्ष फळ देऊन आपले योगदान देतात. भुकेलेल्यांना अन्न देऊन, निरक्षरांना शिक्षण देऊन, रुग्णांना औषध देऊन, बेसहाऱ्यांना आधार देऊन आपणही योगदान द्यायला शिका. जो फक्त स्वत:चा विचार करतो तो दुर्योधन ठरतो. जो इतरांचा भला करतो तो युधिष्ठिर ठरतो. जो सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो तोच कृष्ण आणि महावीर ठरतो. आपण कृष्ण किंवा महावीर बनू शकलो तर ते आपले सौभाग्य आहे, पण किमान स्वत:ला युधिष्ठिरपेक्षा कमी ठरू देऊ नका. इतरांशी तुलना करू नका. ना कोणाची साडी पाहून, ना कोणाची गाडी पाहून. अन्यथा ईर्ष्या आणि लोभ आपल्याला आंधळे करतात. सुखी जीवनाचा मंत्र आहे जे मिळाले आहे ते पुरेसे आहे, असे समजणे. विकासाचा मंत्र आहे. स्वत:सारखे बनाख इतरांची नक्कल करणारा माकड बनू नका.
चौथे सूत्र आहे (रचनात्मक बना). पुरुषार्थ योग्य आणि सार्थक दिशेने असावा. रात्री झोपण्यापूर्वी या तीन गोष्टींवर जरूर विचार करा. आज मी असे काय केले जे मला करू नये होते? आज मी असे काय केले जे मी आणखी चांगल्या प्रकारे करू शकलो असतो? आज मी असे काय केले ज्यामुळे मला अभिमान आणि आनंद वाटतो?
दुसरे सूत्र आहे (निंदा-आलोचना करू नका). प्रशंसा केल्याने प्रेम, प्रेरणा आणि प्रगतीची दारे उघडतात; पण निंदा-आलोचनांमुळे राग-द्वेष आणि वैरभाव वाढतो. जर आपल्या अंगी इतरांची निंदा करण्याची सवय असेल तर आजपासून ती बदलून घ्या. प्रशंसा-तारीफ करा आणि पाहा, ज्याला आपण गाढव समजत होतो, तोही घोड्यासारखा शर्यत जिंकू लागेल.
कल्पना संचेती आणि पूजा धोका यांनी स्वागतगीत सादर केले. मंच संचालन शांतिलाल नौलखा यांनी केले. आभार शेखर संचेती व सिद्धी लोढा यांनी मानले.